Sunday, June 22, 2025
No menu items!
spot_img
HomeUncategorizedशेतकऱ्यांच्या मागण्यासाठी काँग्रेसचे मा. आमदार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने निदर्शने

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी काँग्रेसचे मा. आमदार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने निदर्शने

खामगांव : महाराष्ट्र राज्यात हे महायुतीचे दळभद्री सरकार आल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर बुलढाणा जिल्हयातील बहुतांश शेतकरी अडचणीत असल्यामुळे महाराष्ट्रासह जिल्ह्यातील बळीराजाचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सोयाबीनच्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे. सोयाबीनवर एलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळे शेतकरी सोयाबीन काढत असतांना झडतीचे प्रमाण ४० टक्के असून एकरी फक्त ३ ते ४ क्विंटल होत आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करावा वबहुतांश शेतक-यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे १रू. पिकविम्याचाही भरणा केलेला असुन पिक विम्याची हक्काची रक्कम शेतक-यांना देण्यात यावी, तसेच कोरडा दुष्काळ जाहीर करावा यावा व इतर रास्त मागण्यांसाठी आज खामगाव येथे उपविभागीय कार्यालयावर काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करत मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडलेला आहे, पर्जन्यमान अतिशय कमी झाल्याने शेतकऱ्यांना हमखास साथ देणारे सोयाबीनचे नगदी पीक हातून निघून गेले आहे. जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा मोठी दडी मारल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. ओलिताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर लावून शेतपिकांना पाणी दिले. कशी बशी पिके वाढली आणि ‘यलो मोझॅक’ नावाच्या व्हायरस आणि खोड अळीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे सोयाबीन पिकाची पूर्णतः वाट लागली आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडलेला आहे. पर्जन्यमान अतिशय कमी झाल्याने शेतकऱ्यांना हमखास साथ देणारे सोयाबीनचे पीक हातुन निघून गेले आहे. एकरी ४ क्विंटलचे उत्पादन होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत देण्याची गरज आहे. अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे १ रुपयाचा पिक विमाचा भरणा केला असून त्यामुळे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या हक्काची आहे. पिक विम्याची हक्काची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. ‘यलो मोझॅक’ मुळे या रोगामुळे सोयाबीनचे खूप नुकसान झाले आहे. दुसरे कोणतेही पीक आता शेतकऱ्यांच्या हाती राहिले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील असून अतिशय चिंताग्रस्त झाला आहे. अश्यावेळी शेतकऱ्यांना तातडीने युध्द पातळीवर भरीव मदत देवुन दिलासा द्यावा. सर्व मागण्यांची गंभीरतेने दखल घेवून बुलढाणा जिल्हात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पीक विम्याची हक्काची रक्कम नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्यात यावी अन्यथा खामगाव विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या वतीने बळीराजाच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी अधिक आक्रमकपणे ‘जेलभरो’, ‘रास्ता रोको’ आंदोलन केले जाईल तसेच सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असे काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments